मी मनातला ! खरंतर प्रत्येक जण स्वतःच्या मनात स्वतःच एक वेगळं अस्तित्व घेऊन जगात असतो.कधी ना कधी एकांतात बसून जगण्यापलीकडे एक विचार करत असतो. त्या विचारांना जोड म्हणुन हा ब्लॉग
गुरुवार, ७ मे, २०२०
गुरुवार, ३० एप्रिल, २०२०
The state of boyfriend and girlfriend caused by Corona
The state of boyfriend and girlfriend caused by Corona
It's been a long day
The two have not met
No talking face to face.
Everything is on the phone all night long
No more paperwork
Living online
Love is now virtual
Chatting is everything
The setting is love
Status keeping means
To express feelings
Both are working
Pine for each other ..
Just stop Corona
Let us meet each other now
It's been a long day
The two have not met
No talking face to face.
सोमवार, २७ एप्रिल, २०२०
कोरोना मुळे झालेली प्रियकर आणि प्रियसी ची अवस्था
खुप दिवस झाले
दोघांची भेट नाही
समोर समोर बोलणं नाही.
फोनवरच असतं सगळं रात्र रात्र
आता नाहीत ती कागदी पत्र
ऑनलाईन झालाय जगणं
व्हर्चुअल झालाय आता प्रेम
चॅटिंग म्हणजे सगळं असतं
सेटिंग म्हणजे प्रेम
स्टेटस ठेवण म्हणजे
भावना व्यक्त करणं
दोघांच चाललंय
एकमेकांसाठी झुरणं..
बस संपूदे हा कोरोना
आम्हाला एकमेकांना आता भेटू दे
खुप दिवस झाले
गुरुवार, २३ एप्रिल, २०२०
स्वार्थी माणसा
तु असा कसा होत चाललास
माझं माझं करता करता तू
आपली नाती तू विसरत चाललास
सुखाच्या मागे धावता धावता
आपल्यांची दुःख विसरत चाललास
हे माणसा तू असा कसा होत चाललास.
पैसा भरपूर कमविलास
तो कमविताना तू खूप स्वार्थी झालास
तुझं माझं करता करता तू असा कसा झालास
आपल्यानंच विसरून गेलास
हे माणसा तू असा कसा होत चाललास.
अजूनही वेळ आहे
तुझ्यातल्या माणसाला हरवून देऊ नकोस
फक्त एकच सांगेल या कवितेतून तुला
सुख कायम नाही
महत्व दे नात्याला
नातीच साथ देतील
आयुष्यभर आपल्याला....
ⓒPrakash
सोमवार, १३ एप्रिल, २०२०
चांगले विचार
एका पुस्तकात वाचलेले काही चांगले विचार
१)एखाद्या कामात अपयशी ठरणं अशक्य आहे असे समजून काम करावे.
२)कठीण काळ जास्त वेळ राहत नाही पण मजबूत खंबीर माणूस जास्त वेळ टिकून राहतो .
३)भाग्य त्यांची साथ देतो जे स्वतःच्या कामात गुंततात आणि मगच देवाची मदत मागतात.
४)पेनाची ताकद तलवारी पेक्षा जास्त असते.
५)आपला वेळ आणि पैसे दोन्हीही जपून खर्च करावा.
६)पतंग वाऱ्या बरोबर नव्हे तर त्याच्या विरुद्ध वर जाते.
७)कोणताही गुंता काढण्यासाठी त्याची प्रथम सुरवात करावी लागते.
८)व्यापार सायकली प्रमाणे असतो चालवत राहा नाहीतर पडून जा .
९)समस्या बदल विचार करण्यापेक्षा संधी बद्दल विचार करणे अधिक चांगले .
१०)माश्याने जर तोंड बंद ठेवले तर तो कधी पेचात सापडणार नाही
रविवार, १२ एप्रिल, २०२०
गुरुवार, ९ एप्रिल, २०२०
भेटली होती ती
चारोळ्या
1)भेटली होती तीआवडली होती तीमनात भरली होती तीम्हणून निवडली होती ती
२)काय चाललंय आपल्यातहे असं बरोबर नाहीती म्हणते प्रेम आहेबाकी खोटं असं काही नाही
3)आज भेटलोय आपणउद्या असा भेटायाच त्रास नकोतो म्हणतो ठीक आहेपण भेटायची वेळ झालीकी मग तुझा भास नको
4) ती म्हणते आजकालआपण रोज भेटतोत्यात नवल काय असंआपण कालचीच कहाणी रेटतो
5)त्या दिवशी तुझ्या येण्याचीकारणे मला कळली होतीम्हणून पुन्हा माझी वाटतुझ्या कडे वळली होती
चारोळ्या-1
1)आठवणींचा तुझ्या
काळजाला स्पर्श होतो.
आठवणीत तुझ्या प्रेमाचा
मलाही मग हर्ष होतो.
2)अधीन झालोय मी
स्वाधीन झालोय मी.
मी तिच्या प्रेमाचा
बाधित झालोय मी.
3) पहिल्यांदा पाहशील
रागणेच पाहशील.
मग इतक जवळची हो
की मनातलं ओळखशील.
4)उतरव तू चस्मा
वेगवेगळ्या रंगाचा.
सांग आता धर्म कोणता
आकाशाचा आणि सूर्याचा.
5)भेटणार्यांना भेटण्याची
कारणे खूप असतात.
आणि न भेटणार्यांना ती
द्यायची नसतात.
बुधवार, ८ एप्रिल, २०२०
आपलं डोकं
आपलं डोकं आहे ना ते काही पण करू शकत कोणती असाध्य ते साध्य करू शकतो.आपल्याला हवं ते करू शकतं त्याच्या कडून आपण करवून घेऊ शकतो
पण आपण त्याला समजूत घालून एखाद्या ठिकाणी किवा एखाद्या आशेत ठेवत असतो.समाधानी करून ठेवत असतो सर्व ठीक होईल असा होईल थोडा वेळ लागेल. पण होईल अश्या आशेवर पण मग तसं कधी तरी नाही झालं तर विचार करत बसण्याची वेळ येते म्हणून वाटत कि आपण आपल्या सीमा आजमावल्या पाहिजेत सुरवातीला त्रास वाटेल पण एकदा का आपण यशस्वी झालो कि सर्व आपलाच असत.प्रयत्न कारण गरजेचं आहे
ध्येय ठरवा आणि ते मिळावा
खरंतर प्रत्येकात काही तरी बनण्याची क्षमता असते.शैक्षणिक जीवनात काय बनायचं आहे हे निश्चित करणं गरजेचं असत.या साठी घरातील वातावरण आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असत.मार्गदर्शन योग्यवेळी आणि योग्य मिळालं तर आपण आयुष्यात नक्कीच आपलं स्वतःचा ध्येय ठरवू शकतो आणि ते ध्येय गाठू शकतो.प्रत्येकच्या मनात आपण काहीतरी बनलं पाहिजे हे असत पण नक्की काय बनलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे याची योग्य अशी प्लांनिंग नसते दिशा ठरलेली नसते आणि मग वेळेनुसार आपल्या आयुष्यत जे घडत जातं किंवा आपण करत जातो यातच समाधान मनात जातो..शालेय जीवनात मनात असत कि आपण काहीतरी बनलं पाहिजे.नोकरी व्यासायिक इंजिनियर शिक्षक लेखक गायक पण जे काही बनायचं आहे त्या साठी मार्गदर्शन नसल्याने आयुष्यात जे कधी मिळत जाते त्यात समाधान मानात असतो. नोकरी म्हणजे आपल्याला पुढे काहीतरी भेटेल या आशेने आपण करत असलेली तडजोड असते. सध्या पगार कमी आहे नंतर वाढेल पुढे साहेब चांगला आहे शिकायला भेटत एका ना अशी खूप वाक्य आपण अनेक जणांकडून ऐकत असतो.आणि मग वर्षाला हजार वाढतात म्हणून तीच नोकरी आयुष्यभर करत राहतो..एकदा का संसाराच्या गाड्यात अडकला कि ती नोकरी म्हणजे सर्वस्व उरतं.जास्त पगाराच्या नोकरीसाठी जुनी नोकरी सोडून नवी शोधू शकत नाही करणं नवी नोकरी मिळेल याची शास्वती नाही.जगण्याच्या एका रुटिंगची सवय झाली ती बदलण्याची भीती मनात असतेच. त्यातून बाहेर पडणं कठीण असत.
खरंतर आपण जेव्हा कॉलेज संपून बाहेर पडतो तेव्हा आपण काय बनायचं हे ठरलेलं असलं पाहिजे.कोणत्या क्षेत्रात जायचं याची प्लांनिंग ठरलेली असली तर नक्की आपण आपलं ध्येय गाठू शकतो..
तुर्ताच.थांबतो आणि इतकंच सांगू इच्छितो
"प्रेत्यक व्यक्ती बॉम्ब सारखी असते
फक्त त्याची पिन काढायची गरज असते ".
आपल्यात खूप काही बनण्याची क्षमता असते
पण आपण काय बनत असतो हेच आपल्याला लक्षत येत नाही..
:-धान्यवाद
ⓒPrakash
खरंतर आपण जेव्हा कॉलेज संपून बाहेर पडतो तेव्हा आपण काय बनायचं हे ठरलेलं असलं पाहिजे.कोणत्या क्षेत्रात जायचं याची प्लांनिंग ठरलेली असली तर नक्की आपण आपलं ध्येय गाठू शकतो..
तुर्ताच.थांबतो आणि इतकंच सांगू इच्छितो
"प्रेत्यक व्यक्ती बॉम्ब सारखी असते
फक्त त्याची पिन काढायची गरज असते ".
आपल्यात खूप काही बनण्याची क्षमता असते
पण आपण काय बनत असतो हेच आपल्याला लक्षत येत नाही..
:-धान्यवाद
ⓒPrakash
सोमवार, ६ एप्रिल, २०२०
विचार
काहींच्या वस्तू ब्रॅण्डेड असतात
तर काहींचे विचार
वस्तू वापरल्या जातात
विचार आत्मसात केले जातात
वस्तू संपून जातील
चांगले विचार कायम सोबत राहतील
माणसं ही आजकाल सोडून जातात
स्वतःच स्वार्थ साधला की
विचारांचं तस नसतं ते नेहमी आपल्याला साथ देतात आपल्या सोबत असतात.
या जगात वावरण्यासाठी चांगलं जीवन जगण्यासाठी..
तर काहींचे विचार
वस्तू वापरल्या जातात
विचार आत्मसात केले जातात
वस्तू संपून जातील
चांगले विचार कायम सोबत राहतील
माणसं ही आजकाल सोडून जातात
स्वतःच स्वार्थ साधला की
विचारांचं तस नसतं ते नेहमी आपल्याला साथ देतात आपल्या सोबत असतात.
या जगात वावरण्यासाठी चांगलं जीवन जगण्यासाठी..
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)








