रविवार, १४ जून, २०२०

स्वतःवर विश्वास असेल तर ?

आपला विश्वास स्वतःवर नसतो.स्वतःवर विश्वास असता तर मनात आणलेली प्रत्येक गोष्ट खरी करण्याची ताकद आपल्यात असते. आणि ती गोष्ट खरी करून दाखवली असती. पण आपलं तसं नसत.जेव्हा आपण असं  करू तेव्हा नक्कीच यशस्वी होऊ शकतो. मनात खूप कल्पना असतात पण त्या प्रत्यक्षात आणताना खूप अडचणी येतात  त्या अडचणी कश्या दूर करायच्या  व त्यासाठी काय उपाय करता येतील जेणेकरून आपलया  मनातील कल्पना आपली ध्येय  प्रत्यक्षात आणता येतील.  हे शोधणं  गरजेचं आहे. 
 नवीन काही तरी करण्याची प्रेत्यकाची  इच्छा असते पण अंमलबजावणी करण्याची वेळ येते. तेव्हा मग घरातले शेजारचे गावातले काय बोलतील हा एका प्रश्न समोर उभा राहतो आणि या प्रश्नात आपण जर अडकलो कि काय करावं हेच काळात नाही आणि मग आपण समोर येईल. ते मिळेल ते करत असतो  .आजकालची तरुण पिढी नवीन इनोवेशन मध्ये मागे पडत आहे. जगात काय चालू आहे कोणत्या क्षेत्रात संधी आहे त्यात आपण काय करू शकतो आपल्या स्वतःची आवड काय आहे. आपल्याला काय करायला जमेल याचा शोध घेतला पाहिजे. स्वतःवर विश्वास असेल तर हे नक्की करू शकतो या साठी त्यांना घरातून प्रोचाहन दिलं  पाहिजे. शालेय शिक्षणा सोबत व्यवसायिक शिक्षण घेणं हे महत्वाचं आहे. 
म्हणून म्हणावं वाटत की इतरापेक्ष्या स्वतःवर विश्वास ठेवावा आणि ध्येय प्राप्ती साठी प्रयत्न करावं. इतरांचा विश्वास तुमच्या वर असेल तर तुम्ही फक्त नोकरीच करू शकता स्वतःवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही नोकरी निर्माण करु शकता..

ⓒPrakash

चारोळ्या ४

1)स्वतःबद्दल एखाद्याला
खूप काही सांगून जातो आपण.
खरोखर तितके
खरे असतो का आपण . . .

2)प्रेत्यक व्यक्तीची 
एक कथा असते.
काही व्यक्तीसाठी
ती व्यथा असते...


ⓒPrakash

सोमवार, १ जून, २०२०

आपला आगरी कोळी समाज मुळात इथला स्थानिक व्यासायिक


आपला आगरी कोळी समाज मुळात इथला स्थानिक व्यासायिक आपले व्यवसाय मिठागरे मासळी दूध भाजी चे मळे गवंडी काम (मेस्त्री) गरजेच्या च्या  वस्तूची दुकाने  इत्यादी येत्या ५० वर्षात परिस्थिती खूप बदलली आमचा व्यवसाय सोडून नोकरीच्या मागे लागलो आणि याच व्यवसायात परकीय येऊ लागले बंद झालेली आमची व्यवसायिक वृत्ती पुन्हा सुरू करावी लागेल अन्यथा परिस्थितीत खूप गंभीर होऊ शकते आपले स्थानिक उ्योगांना पुन्हा चालना देणे गरजेचे आहे...सरकारी प्रकऌप या मुले आपले  मूळ व्यवसाय बंद पडले जमिनी गेल्या आणि आमचा शेती भाजीचे मळे दुध आणि इतर जोड उद्योग कमी झाले मला वाटतं आमच्या आजोबा पासून ची पिढी नोकरी कडे वळली असेल त्यांचा व्यवसाय होता दूध उद्योग आणि भाजीचे मळे नोकरी करता करता मुलांच्या मनात नोकरी रुजली ते कळलेच नाही आणि मग आपणही  तेच करू लागलो मग शेती कडे कमी लक्ष्य दिले गेले त्याला जोड होती पशुपालन दूध उद्योग गायी म्हशी विकल्या जाऊ लागल्या. जणू मूळ आमची व्यवसायिक वृत्ती कुणीतरी  हिरावून घेतली गेली. मुळात उद्योगाचे मूळ आम्ही आणि आज आम्हीच नोकरीचे झाड होत आहेत..पण त्याला आता व्यवसायाच्या वटवृक्षात रूपांतर करणे गरजेचे आहे त्यासाठी आपण समाजात एकी करून एकमेकांना प्रोसहित करणे गरजेचे आहे तरच आपल्या समाजाची प्रगती होऊ शकते अनाथ काळ कठीण आहेच परिस्थिती हता बाहेर जाण्याआधी वेळीच सावधान झालेले योग्य आहे नाहीतर इतर समाज्याचा धंद्यात आपल्याला नोकरी करावी लागेल ...
ⓒPrakash

कोरोना कसला हा आजार

 कोरोना
कसला हा आजार कि 
मांडलाय नुसता बाजार
अफवा आहेत हजार
आणि लोक झालेत बेजार
लॉक डाऊन मध्ये होत आहे वाढ
लॉक डाऊन एक दोन तीन चार
घरात बसून मात्र लोकं झालीत बेजार 
कसला हा आजार कि 
मांडलाय नुसता बाजार
रोज वाढत आहे रुग्णांचा जोर 
दवाखाने होत आहेत कमजोर 
सरकार करतोय आपली चिंता
पण सुविधांचा होत आहे इथे गुंता 
कसला हा आजार कि 
मांडलाय नुसता बाजार
सगळीकडून होत आहे मदतीचा हातभार
त्यांचे मानले पाहिजेत हतजोडून आभार 
कसला हा आजार 
मांडलाय नुसता बाजार
बस मला एकाच प्रश्न पडलाय 
कुठे गेलेत बाकीचे आजार
ⓒPrakash





गुरुवार, ७ मे, २०२०

फिरत आहे बाहेर कोरोनाचे राक्षस

नको बाहेर कुठे इकडे तिकडे सगळीकडेच फिरत आहे हे राक्षस आज मनात भीती निर्माण झाली कोरोनाची वारी आमच्या जवळपास आली सूरवात चीनमध्ये झाली अशी कशी महामारी आली हॉस्पिटल थकले डॉक्टर थकले थकले सारे जग हे देवा तूच आता आमचे कडे बघ उपाय एकाच आहे स्वतःच स्वतःची काळजी घेणे आणि घरात बसून राहणे


गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

The state of boyfriend and girlfriend caused by Corona

The state of boyfriend and girlfriend caused by Corona

It's been a long day
The two have not met
No talking face to face.
Everything is on the phone all night long
No more paperwork
Living online
Love is now virtual
Chatting is everything
The setting is love
Status keeping means
To express feelings
Both are working
Pine for each other ..
Just stop  Corona
Let us meet each other now
It's been a long day
The two have not met
No talking face to face.
 

सोमवार, २७ एप्रिल, २०२०

कोरोना मुळे झालेली प्रियकर आणि प्रियसी ची अवस्था


खुप दिवस झाले
दोघांची भेट नाही 
समोर समोर बोलणं नाही.
फोनवरच असतं सगळं रात्र रात्र 
आता नाहीत ती कागदी पत्र
ऑनलाईन झालाय जगणं
व्हर्चुअल झालाय आता प्रेम
चॅटिंग म्हणजे सगळं असतं 
सेटिंग म्हणजे प्रेम 
स्टेटस ठेवण म्हणजे
भावना व्यक्त करणं
दोघांच चाललंय 
एकमेकांसाठी झुरणं.. 
बस संपूदे हा कोरोना  
आम्हाला एकमेकांना आता भेटू दे 
खुप दिवस झाले
दोघांची भेट नाही 
समोर समोर बोलणं नाही.

ⓒPrakash






गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

स्वार्थी माणसा

तु असा कसा होत चाललास 
माझं माझं करता करता तू
आपली नाती तू विसरत चाललास
सुखाच्या मागे धावता धावता
आपल्यांची दुःख विसरत चाललास
हे माणसा तू असा कसा होत चाललास.
पैसा भरपूर कमविलास 
तो कमविताना तू खूप स्वार्थी झालास 
तुझं माझं करता करता तू असा कसा झालास 
आपल्यानंच विसरून गेलास 
हे माणसा तू असा कसा होत चाललास.
अजूनही वेळ आहे 
तुझ्यातल्या माणसाला हरवून देऊ नकोस
फक्त एकच सांगेल या कवितेतून तुला  
सुख कायम नाही
महत्व दे नात्याला 
नातीच साथ देतील
आयुष्यभर आपल्याला....

ⓒPrakash

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

चांगले विचार

एका पुस्तकात वाचलेले काही चांगले विचार 

१)एखाद्या कामात अपयशी ठरणं  अशक्य आहे असे समजून काम करावे. 
२)कठीण काळ जास्त वेळ राहत नाही पण मजबूत खंबीर माणूस जास्त वेळ टिकून राहतो .
३)भाग्य त्यांची  साथ देतो जे स्वतःच्या कामात गुंततात आणि मगच देवाची मदत मागतात.
४)पेनाची ताकद तलवारी पेक्षा जास्त असते. 
५)आपला वेळ आणि पैसे दोन्हीही जपून खर्च करावा. 
६)पतंग वाऱ्या बरोबर नव्हे तर त्याच्या विरुद्ध वर जाते. 
७)कोणताही गुंता काढण्यासाठी त्याची प्रथम सुरवात करावी लागते.
८)व्यापार सायकली प्रमाणे असतो चालवत राहा नाहीतर पडून जा .
९)समस्या बदल विचार करण्यापेक्षा संधी बद्दल विचार करणे अधिक चांगले .
१०)माश्याने जर तोंड बंद ठेवले तर तो कधी पेचात सापडणार नाही

रविवार, १२ एप्रिल, २०२०

वादा

निभा सके ऐसा 
कोई वादा करो 
       अगर निभा ना सके 
           तो इरादा भी न करो..




गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

चारोळी-3

किती भावना लपवल्या
तरी डोळे त्या सांगतात
मनातलं गुपित आपलं 
लोकांसमोर मांडतात
 

भेटली होती ती

चारोळ्या 
1)भेटली होती ती
आवडली होती ती
मनात भरली होती ती
म्हणून निवडली होती ती

२)काय चाललंय आपल्यात
हे असं बरोबर नाही
ती म्हणते प्रेम आहे 
बाकी खोटं असं काही नाही

3)आज भेटलोय आपण
उद्या असा भेटायाच त्रास नको
तो म्हणतो ठीक आहे 
पण भेटायची वेळ झाली
की मग तुझा भास नको

4) ती म्हणते आजकाल
आपण रोज भेटतो
त्यात नवल काय असं
आपण कालचीच कहाणी रेटतो

5)त्या दिवशी तुझ्या येण्याची
    कारणे मला कळली होती
    म्हणून पुन्हा माझी वाट
      तुझ्या कडे वळली होती

चारोळ्या-1

1)आठवणींचा तुझ्या
      काळजाला स्पर्श होतो.
      आठवणीत तुझ्या प्रेमाचा 
        मलाही मग हर्ष होतो.

2)अधीन झालोय मी
         स्वाधीन झालोय मी.
          मी तिच्या प्रेमाचा 
              बाधित झालोय मी.

3) पहिल्यांदा पाहशील 
     रागणेच पाहशील.
       मग इतक जवळची हो 
         की मनातलं ओळखशील.

4)उतरव तू चस्मा 
         वेगवेगळ्या रंगाचा. 
                  सांग आता धर्म कोणता 
                              आकाशाचा आणि सूर्याचा. 
5)भेटणार्यांना भेटण्याची 
     कारणे खूप असतात. 
      आणि न भेटणार्यांना ती 
       द्यायची नसतात.